रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
मोठा गाजावाजा करत नगरच्या महापालिका प्रशासनानं कालपासून (दि. १८) स्वच्छ सर्वेक्षण अभियान हाती घेतलं खरं. पण या अभियानाची प्रचंड चीड नगर शहराजवळच्या केडगावकरांमध्ये दिसून येत आहे. या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर केडगावच्या शास्त्रीनगर मध्ये राहणारे नागरिक विचारताहेत, काय कामाचं आहे नगर महापालिकेचं स्वच्छ सर्वेक्षण अभियान?
आमच्या शास्त्रीनगरमध्ये पहा जरा, काय चाललंय ते.
व्हिडिओ
केडगावच्या शास्त्रीनगरमध्ये ही जी मोठी समस्या आहे, अशी समस्या नगर शहरासह परिसरात त्याचप्रमाणं उपनगरात ठिकठिकाणी पाहायला मिळते आहे.
बांधकाम व्यावसायकांनी सावेडी केडगाव बोल्हेगाव नवनागापूर आदी उपनगरांमध्ये मोठमोठ्या नागरी वसाहती उभारल्या. ‘रोहौसिंग स्कीम’मध्ये अनेकांनी घरं विकत घेतली. परंतु याठिकाणचं मैलामिश्रित पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी अर्थात बिल्डर्स लोकांनी कुठंही व्यवस्थित असं नियोजन केलं नाही. या रो हाऊसिंगचं ‘आउटलेट’ मोकळ्या जागेत सोडण्यात आलं.
काही दिवसांनी या मोकळ्या जागेच्या मालकाने हे ‘आउटलेट’ बंद केलं. परिणामी हे मैलामिश्रित पाणी आजमितीला नागरिकांच्या घरात साचतंय. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा डांगोरा पेटवणाऱ्या नगर महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्ये कडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा केडगावच्या शास्त्रीनगर भागातले संतप्त नागरिक महापालिकेवर मोर्चा आणण्याचा विचार करतील. या संदर्भात काही नागरिकांनी रोखठोक 24 न्युज नेटवर्कशी खासगीत बोलताना संताप व्यक्त केला आहे.