अहिल्यानगर'या' दिवसापासून सनातन धर्माचं नामोनिशाण मिटणार ; अधर्माचा वाढणार बोलबाला...!

‘या’ दिवसापासून सनातन धर्माचं नामोनिशाण मिटणार ; अधर्माचा वाढणार बोलबाला…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

उत्तर प्रदेशातल्या ब्रजमंडळात स्थित असलेल्या
पवित्र अशा गोवर्धन पर्वताचा आकार पूर्वी खूप मोठा होता. कलियुगाच्या सुरुवातीपासूनच या पर्वताची उंची हळू हळू कमी होऊ लागली आहे. आज गोवर्धन पर्वताचा जितका आकार दिसत आहे, त्यातही सतत घट होत चालली आहे. असं म्हणतात, की ज्या दिवशी गोवर्धन पर्वत पूर्णपणे जमिनीशी एकरुप होईल म्हणजेच संपेल, त्या दिवसापासून कलियुग चरम काळात पोहोचेल. पृथ्वीवरुन सनातन धर्माचं नामोनिशान मिटेल आणि अधर्माचा बोलबाला वाढणार आहे.

गोवर्धन पर्वताशी संबंधित एक मान्यता अशीही आहे, की त्याचे दगड कोणीही व्यक्ती आपल्या घरी नेऊ शकत नाही. जर तो असे करतो तर त्याचे वाईट दिवस सुरु होऊ शकतात. त्याचे सुख आणि संपत्तीही लवकरच नष्ट होऊ शकते. गोवर्धन पर्वताचे दगड जास्तीत जास्त ८४ कोस म्हणजेच ब्रजमंडळाच्या सीमेपर्यंतच नेऊ शकतात. त्यापुढे ते नेणे महापाप मानले गेले आहे.

धर्मग्रंथांनुसार दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. यंदा हा सण २ नोव्हेंबर, शनिवारी आहे.

या दिवशी महिला आपल्या अंगणात गावरान गायीच्या शेणापासून केलेल्या गोवऱ्यांनी गोवर्धन पर्वताची आकृती बनवून त्याची पूजा करतात. गोवर्धन पर्वत हा मूळचा उत्तर प्रदेशातील ब्रजमंडळात स्थित आहे. धर्मग्रंथांमध्ये याला साक्षात भगवान श्रीकृष्णाचेच रूप मानले गेले आहे. रोज हजारो लोक गोवर्धन पर्वताचे दर्शन आणि परिक्रमा करण्यासाठी येतात.
गोवर्धन पर्वताच्या परिक्रमेचं विशेष महत्त्व सांगितले आहे. अशी मान्यता आहे, की जो कोणी गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात.

गोवर्धन पर्वत परिक्रमेचे काही आवश्यक नियम आहेत. गोवर्धन पर्वताची परिक्रमा करताना पायांत बूट, चप्पल घालून नये. गोवर्धन परिक्रमा करताना बिडी-सिगारेट, तंबाखू इत्यादीचे सेवन करु नये. परिक्रमा कोणत्याही वाहनांत बसून करु नये. परिक्रमा करताना व्यर्थ गोष्टी बोलू नये. गोवर्धन पर्वताची परिक्रमा सुरु असताना भगवंताचं भजन करावं. परिक्रमेदरम्यान कोणतेही वाईट विचार मनात आणू नये.

आणखी महत्वाच्या बातम्या