वाल्मिकी महिला ब्रिगेड सेवाभावी संस्था भारतामध्ये व महाराष्ट्रात सर्वप्रथम महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या संघटनेला विविध समाजाकडून खूप मोठा पाठिंबा मिळत आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. वाल्मिकी समाज ब्रि.अध्यक्ष राजेंद्र नकवाल, महासचिव प्रेमप्रकाश चंदिले, संतोष सारसर, अध्यक्ष राजेश बैद, सुमित नकवाल, अनिल चौटीले, साहिल बैद, नितेश चव्हाण, आकाश चंदिले, राकेश सारवान (अध्यक्ष), निलेश चौटीले, समजभूषण ब्रि.राधेलाल नकवाल, किसन महाराज उदासी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
यावेळी प्रमुख अतिथी मनपाच्या माजी नगरसेविका शिलाताई चव्हाण, शिवराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, प्राध्यापिका सुमित्रा छजलाने, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता कुडिया, ग्रामपंचायत सदस्य उमा छजलाने, रीना सारवान, सुनिता बैद,अनुप गोहेर आदी महिला उपस्थित होत्या.
यावेळी वाल्मिकी महिला ब्रिगेडच्या नवनिर्वाचित अध्यक्षा पुष्पा नकवाल, मंजू बैद, पूजा चंदिले सचिव पुजा नकवाल, सपना उदासी खजिनदार, कविता सारसर, रूपाली चौटीले, उपाध्यक्ष, कविता नकवाल उपाध्यक्ष पूजा बैद, उपसचिव करिष्मा संघलिया सहसचिव, सारदा सचिन बैद, सहखजिनदार पूनम नकवाल सहखजिनदार पुनम सेवक उपस्थित होत्या.
प्रास्ताविक राजेश बैद यानी केले. मार्गदर्शन राजेंद्र नकवाल यांनी केले. शिवराष्ट्र सेना उपप्रमुख कुणाल बैद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. अनुप गोहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.